स्वामी म्हणतात ......
प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही...
सुमन नावाची एक स्वामीभक्त स्त्री, गरोदर असतांना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णू बरोबर येते. स्वामी म्हणतात:-"तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायचीतैयारी ठेव." सुमनला स्वामी-वचन खरं होणार ही खात्री होती, पण "तैयारी ठेव" या ताकीदीनी तिचा थरकंप सुटतो. ती या गोष्टी मुळे फार चिंतेत राहायची. सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी-दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतं देतात.शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणुन घेतो. सुमन एकदा विहिरीतून पाणी आणतांना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते.वैद्यबुवा गर्भस्थ शिशुचं निधन झालं आहे, अस निदान करतात आणी सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात.हे ऐकुन सुमन फार खचून जाते. इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्यानी पीक खराब होते. शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात. त्याच्यावर देशोधडी वर जायची वेळ येते. इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतर्यामी स्वामी बालळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात. स्वामी आणी बाळप्पा मध्ये संवाद होतो-स्वामी: "बाळ्या! अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मानी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते. "बाळप्पा: "स्वामी यावर काही उपाय नाही का?" स्वामी: "अरे एकदा पापाचे विपरीत-प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगालामागे-पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात." "अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो. मनुष्याच्या हातून कळत-नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणीत्याचं परिवर्तन विपरीत-प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते." "लोग कहते है की भगवान के यहा न्याय मे देर है, अरे भगवान सबको समय देता है अपने पापं नष्ट करने का." "कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नाही माने, तब उनका संहार किया." बाळप्पा: "स्वामी मग अश्या विपरीत प्रारब्धात मनुष्यांनी काय करावे?" स्वामी: "अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो, आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो." "पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो, म्हणतो - "मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले?". "बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आता पर्यंत केली, ती जर केली नसती तर आणखी भयाण संकट आले असते. "तिकडे शेत व्हायाल्यामुळे शिवा पण खचलेला असतो. त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते. पण मग त्याच्या मनात विचार येतो, की स्वामीनी धान्याचे खाली पोते देउन आपल्यालाएक खुण केली होती. तो खंबीर होऊन उठतो, आणी आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो. स्वामी त्याला सांगतात की जसा तु खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे. तिला जाऊन काही बोध कर. पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते, आणी वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते. पण योगा-योगानी शिवा आणी विष्णू तिथे येऊन तिला अडवतात. तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात: "सुमन! मरण सोपं नसतं. आणी मरण जीवाच्या हाती नसतं. अरे जर देवानी ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही." "मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार." "अरे आपल्या सासू, नवरा आणी भावाचा विचार कर. तुझ्या या पाऊला मुळे त्यांना काय वाटले असते?" सुमन म्हणते: "स्वामी, संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू?" तितक्यात शारदा (शिवाची बायको) आपल्या नणंदेला आपलं बाळ देते. शारदा: "हे माझं बाळ घे! याला तु आपल्या मुला सारखे वाढव. याची तुला जास्त गरजआहे." "मला काय, मला दुसरं अपत्य होईल." स्वामीवचना प्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणी आनंदानी पुढच्या आयुष्याची सुरुवात करते. तात्पर्य असे की,
१) स्वामीनंवर विश्वास असणे महत्त्वाचे.
२) प्रारब्ध हे भोगावेचं लागते.
३) स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे माघे करु शकतात.
४) भक्ती (सेवा) महत्त्वाची.
५) नामस्मरण महत्त्वाचे.
६) आपल्या भक्ती मुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पध्दतीने येऊ शकतात ती येत नाहीत, आपण हे विसरता कामा नये.
७) सुख आसो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्ती वर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको.
८) मरण हे ठरलेल्या वेळेतचं येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मूत्यु आसे खेळ ज्यांचा.
🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद अक्कलकोट निवासी कृपासिंधु भक्तपालका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा 🌹
संदर्भ: स्वामी ची बखर
टिप्पण्या